भाषा निवडा

वेळ
7 AM to 6 PM
पसंद
668
पहिले
26703
टिप्पण्या
1 People

   

किल्ले

जंजीरा किला

माहिती

रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.

राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.

पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स 1734 अशी 117 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमजीआप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला .जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्भमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे १९ बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५९२ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'

असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.

जंजिरा म्हणजे समुद्राने वेढलेला किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आजही स्थिर आहे. जंजिरा किल्ल्याच्या चारी बाजूला अरबी समुद्राचा परिसर आहे. व या किल्ल्याच्या जवळच मुरुड नावाचे गाव आहे त्यामुळे या किल्ल्याला मुरुड- जंजिरा असे म्हणतात.

जंजिरा किल्ल्याचे बांधकाम आजही भक्कम आहे. व या किल्ल्याच्या तटार सुमारे 572 तोफा आहेत त्यामुळेच जंजिरा किल्ल्याला अभेद्य किल्ला म्हणून ओळखतात. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी व हितासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. जंजिरा हा किल्ला अनेक काळापासून महाराष्ट्रामध्ये उभारलेला आहे. जंजिरा हा शब्द आरबी भाषेतील जझीरा हा शब्दावरून आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट आणि हा जंजिरा किल्ला चारी बाजूनी समुद्र असलेल्या ठिकाणी असल्याने या किल्ल्याला जंजिरा हे नाव दिले असावे.

आढावा

रेटिंग
एकूण पहिले 26703
एकूण पसंती 668
एकूण टिप्पणी 1

अधिक माहिती..

असे म्हणतात की, निजामाच्या आदेशावरून बुरहाणखानने जंजिरा किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. पुढे इ.स. 1617 मध्ये अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केले व त्यांना संपूर्ण कष्टाने जंजिरा किल्ला लढवला. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण कोणीही यशस्वी होऊ शकला नाही. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जंजिरा किल्ल्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. सन इ.स. 1617 ते इ.स. 1947 अशी एकूण 330 वर्षे हा जंजिरा किल्ला अजिंक्य राहिला.

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांमुळे हा जंजिरा किल्ला सदैव अजिंक्य राहिला. ह्या किल्ल्याला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी तर या किल्ल्याच्या जवळच पाच- सहा किलोमीटरच्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता तरीसुद्धा त्यांना मुरुडचा जंजिरा किल्ला जिंकणे शक्य झाले नाही.ओंडके जमिनीत एका पुढे एक रोवून बंदिस्त केलेली जागा होय. रामा पाटील नावाचा व्यक्ती हा त्या कोळी लोकांचा प्रमुख होता.व त्याचे हे महत्त्वाचे स्थान कालांतराने त्याच्या लक्षात आले. रामा पाटील याने राजापुरीच्या ठाणेदाराला किल्ल्याच्या ठिकाणी बोलवले व त्या लुटेरु लोकांना पकडण्यात आले. त्याच्या या कर्तृत्वा बद्दल सुभेदाराने बादशाहाला कळविले.

कित्येक मोठमोठ्या पराक्रमांनी ह्या किल्ल्यासाठी प्रयत्न केले परंतु हा किल्ला कोणालाही मिळाला नाही. मराठा साम्राज्यांनी सुद्धा 11 वेळा हा किल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न केला तरी सुद्धा मराठ्यांना जंजिरा किल्ल्यावर ताबा मिळवता आला नाही ही गोष्ट या किल्ल्या बद्दल ची मोठी विशेषता आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे गडकिल्ले आणि जलदुर्गाच्या इतिहासामध्ये मराठ्यांना ज्या किल्ल्यावरती ताबा मिळवता आला नाही तो एकमेव किल्ला म्हणजे हा जंजिरा किल्ला होय.

संभाजी महाराजांनी हा किल्ला मिळवण्यासाठी जंजिरा किल्ल्या पासून पाच ते सहा किलो मीटरच्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला तरी पण त्यांना जंजिरा किल्ला मिळवणे अशक्यच झाले.जंजिरा किल्ला अजिंक्य राहण्याचे कारण म्हणजे ह्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान, मजबूत तटबंदी, बुरूजे, चारी बाजूंनी असलेला समुद्र, निरीक्षण चौक्या, 572 तोफा, आणि विस्तीर्ण क्षेत्रफळ या वैशिष्ट्यांमुळे हा जंजिरा किल्ला फार काळ अजिंक्य राहिला.

चारी बाजूंनी समुद्र लाभलेला हा जंजिरा किल्ला पर्यटकांना खूप आकर्षित करतो. जंजिरा किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. व 19 बुलंद बुरुज सुद्धा आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहे. जंजिरा किल्ल्यावर सुमारे 572 तोफा असल्याची नोंद आहे. त्यातील कालाल, बांगडी, लांडाकासम, व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. व याच तोफांमुळे या किल्ल्याकडे पर्यटकांचे लक्ष वेधत आहे.तसेच किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आहे आणि हा वाडा आजही पडक्या अवस्थेत बघायला मिळतो. समोरच दोन मोठे तलाव सुद्धा आहेत. जंजिरा किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा होता.

जंजिराच्या तटबंदीवरुन सभोवतालचा विस्तृत प्रदेश दिसतो. यामध्ये संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग दिसतो. तसेच सामराजगड सुद्धा येथून दिसतो. त्यामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

फोटो गॅलरी..



व्हिडिओ गॅलरी..

आपत्कालीन सेवा


पालिका कार्यालय
  •      02144274026
  •    Lokmanya Tilak Rd, Bhandarwada, Murud, Maharashtra 402401
पोलीस चौकी
  •       02144274033
  •    Murud Janjira, Murud - 402401
रुग्णवाहिका
अग्निशमन केंद्र
तहसील कार्यालय
गॅरेज
  •      
  •   
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट
  •      

वापरकर्ता टिप्पण्या (1)

  • Ritesh Dayama
    January 07, 2023, 06:04 PM
    One of the best Fort in maharashtra

तुमची प्रतिक्रिया द्या